मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं: शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

मुंबई - संपाबाबत शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना गंडवलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि किसान क्रांती मोर्चातील सदस्यांमध्ये आज पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांचा संप मागे घेण्यात आल्याचे जाहीर झाले. मात्र, त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या संपात फूट पडल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक बाजार समित्यांमधील व्यवहार अद्याप बंदच आहेत.

पवार म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी असल्याचा आरोप करणे हे पोरकटपणाचे लक्षण आहे. कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच का?' 'सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतकरी युद्धात जिंकला मात्र तहात हरला. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवलं आहे.''

मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनांचं गाजर- पृथ्वीराज चव्हाण
शेतकऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फक्त शेतकऱ्यांना आश्वासनांचं गाजर दाखविण्यात आले. अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. मागण्या मान्य झाल्याची केवळ वातावरण निर्मिती केली. स्वामिनाथन आयोगाचं काय केलं? केवळ शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतले लोक आंदोलनात दिसले नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com