स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, जे बोलू ते खरं बोलू: मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तुमचं पाप... यांना निव्वळ राजकारण करायचंय... ते मगरमछ के आसू आहेत, मी 1000 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे, जे बोलू ते खरं बोलू, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

नागपूरमध्ये आजपासून (सोमवार) हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली असून, विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यंदाच्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे. विरोधकांनी रविवार घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर केली होती. तर, मुख्यमंत्र्यांनीही उत्तर देताना डल्ला मारणारेच हल्लाबोल करत असल्याचे म्हटले आहे.

आज सकाळी कामकाज सुरु होताच विधानभवनात गदारोळ झाला. मुख्यमंत्री म्हणाले, की आघाडी सरकारनेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली. तुम्ही 2008 मध्ये अख्ख्या विदर्भाला जितके पैसे दिले, तेवढे आम्ही फक्त बुलडाण्याला दिले. जेव्हा यावरील चर्चेला उत्तर देऊ तेव्हा दूध का दूध पानी का पानी होईल. 

शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे- विरोधक
शंभर टक्के कर्जमाफी झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज सुरू होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांकडून देण्यात आला आहे. विरोधकांच्या गोंधळात कामकाज रेटण्याचा सत्ताधाऱयांचा प्रयत्न आहे. 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, असे मुख्यमंत्र्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावे, असे काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री यांना गुलाबी बोंडअळीने फस्त केलेले कपाशीचे बोंड दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com