विखे-पाटील हे विषारी औषध - गोऱ्हे

विखे-पाटील हे विषारी औषध - गोऱ्हे

नागपूर - शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना पिकावरील किडीची उपमा देणाऱ्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे विषारी औषध असल्याचे सांगून शिवसेनेच्या प्रवक्‍त्या नीलम गोऱ्हे यांनी जशास तसे उत्तर दिले. या वेळी त्यांनी कापूस, सोयाबीन, धान पिकावरच नव्हे, तर राजकारणातही कीड लागल्याचे सांगितले.

शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत ९३ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उद्धव ठाकरे आणि भाजप पिकांवरील किडीप्रमाणे असल्याची टीका विखे पाटलांनी केली. यास प्रत्युत्तर देत नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘किडीपेक्षा औषध शेतकऱ्यांसाठी जहाल असते. विषारी औषधांच्या फवारणीमुळेच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामुळे विखे पाटील पिता-पुत्रांना मंत्रिपद मिळाले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही आहे. या योजनेला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले आहे. त्यास साजेशी अंमलबजावणी केली जात आहे. विखे पाटील यांनी शेतकऱ्यांचा संप फोडण्यासाठी प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा कळवळा दाखवित आहेत. ते विषारी रसायन असून शेतकऱ्यांसाठी घातक आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com