इतिहासाला लाजवेल एवढे घोटाळे यांनी केले; MPSC समन्वय समितीचा निशाणा

MPSC समन्वय समितीने महाराष्ट्रातील अपूर्ण असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या भरतीची माहिती देणारे एक पत्रक आपल्या ट्वीटवर शेअर केले आहे.
MPSC समन्वय समिती
MPSC समन्वय समितीSakal

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मागच्या तीन वर्षात दिलेल्या नोकऱ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना असणाऱ्या MPSC समन्वय समितीने एक पत्र जारी केले आहे. त्यामध्ये त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

MPSC समन्वय समितीने महाराष्ट्रातील अपूर्ण असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या भरतीची माहिती देणारे एक पत्रक आपल्या ट्वीटवर शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी २०१८ ते २०१९ पासून प्रलंबित असणाऱ्या आणि परीक्षा होऊनही अपूर्ण असलेल्या भरती प्रक्रियांची माहिती दिली आहे.

MPSC समन्वय समिती
पाकिस्तानात शिक्षण घेतलेल्यांना भारतात नोकरी नाही; UGC & AICTEचे आदेश

यासंदर्भात त्यांनी सरकारवर निशाना साधत म्हटलंय की, आज आम्ही महाविकास आघाडीचा कच्चा चीठ्ठाच घेऊन आलो आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासाला लाजवेल इतके सरकारी नोकरभरती घोटाळे या सरकारने केले. प्रचंड बेरोजगारीच्या काळातही गेल्या तीन वर्षात सरळसेवेद्वारे या सरकारने फक्त ८५४७ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. पुढच्या निवडणुकांत आमचा हाच मुद्दा असेल. असं ट्वीट करत त्यांनी सरकारवरील रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान त्यांनी ट्वीट केलेल्या पत्रकात पूर्ण झालेल्या भरती प्रक्रिया, प्रलंबित असलेल्या भरती प्रक्रिया, परीक्षा झाल्यावरही अपूर्ण असलेल्या भरती प्रक्रिया याची माहिती दिली आहे. आरोग्य भरती आणि पोलिस भरती या दोन परीक्षांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून घोटाळ्यामुळे त्या भरती प्रलंबित आहेत.

तसेच शिक्षक भरती, MIDC भरती, आरोग्य भरती आणि म्हाडा भरती या भरत्यांच्या परीक्षा झाल्या असून घोटाळ्यांमुळे त्या प्रलंबित आहेत. जिल्हा परिषद भरती, पशुसंवर्धन विभाग भरती आणि MIDC विभाग-ड भरती या प्रलंबित भरत्या आहेत. तसेच तलाठी भरती, पोलिस भरती, प्राध्यापक भरती आणि शिक्षक भरती या भरत्या प्रलंबित आहेत अशी माहीती यामध्ये दिलेली आहे.

MPSC समन्वय समिती
मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अशा कारभारामुळे विद्यार्थांना त्रास सहन करावा लागत आहे. परिक्षेतील घोटाळे आणि भरतीसाठी विलंबामुळे काही विद्यार्थ्यांनी कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. याप्रकरणी विद्यार्थी आंदोलन करत असतात पण सरकारचा भरती संदर्भातील संथपणा पाहता समन्वय समितीने मागच्या तीन वर्षाचा लेखाजोखाच या माध्यमातून मांडला आहे.

या ट्वीटवर विद्यार्थ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या असून नोकरभरती झाली नाही तर मतदान करायचे नाही अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com