सोशल मीडियावरील टीकेचा भाजपने घेतला धसका 

सोशल मीडियावरील टीकेचा भाजपने घेतला धसका 

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ ठरण्याची भीती या पक्षामधून व्यक्त होत आहे. भाजपच्याच भाषेत विरोधी पक्ष सोशल मीडियावरून उत्तरे देऊ लागल्याने भाजपमध्ये घालमेल सुरू आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकताना भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला होता. त्याचा भाजपला फायदाही झाला. "अच्छे दिन आनेवाले है'पासून "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' या त्या वेळच्या जाहिराती अद्याप लोकांच्या लक्षात आहेत. सुमारे तीन वर्षांनंतर विरोधकांनी भाजपविरोधात अशीच मोहीम राबवली आहे. "विकास पागल हुआ है' या टॅगलाईनने तर सध्या धुमाकूळ घातला आहे. भाजपने याचा भलताच धसका घेतला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना याची गंभीर दखल घ्यावी लागली आहे. शहा यांनी गुजरातमध्ये "सोशल मीडियावर विश्‍वास ठेवू नका' असे आवाहन केले आहे. मुंबईत झालेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सोशल मीडियावर विश्‍वास न ठेवता, अवलंबून न राहता प्रत्येक कार्यकर्त्याने बूथ लेव्हलवर काम करावे', असे आवाहन केले आहे. भाजपविरोधात सध्या सुरू असलेल्या मोहिमेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी होत आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघही चिंताग्रस्त आहे. याचा पक्षाला जबर फटका बसण्याचा धोका आहे, असे राज्यातील भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com