मोदींच्या पराभवाची चर्चा चहा टपरीवरच होईल - शेट्टी

Raju-Shetty
Raju-Shetty

बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला गांधीवादी व लोकशाहीचे पुजारी असल्याचा आव आणतात. मोदींना एवढी लोकशाहीची चाड असेल, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची आम्ही केलेली मागणी मान्य करावी. अन्यथा मोदी हे ढोंगी आहेत, असे समजले पाहिजे, अशी टीका करीत ज्यांनी चहाचं भांडवल करून लोकांना फसविले तिच मंडळी मोदींचा पराभव का झाला याची चर्चा चहाच्या टपरीवर करताना दिसतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 

देउळगाव मही येथील शेतकरी सन्मान अभियानांतर्गत आयोजित एल्गार मेळाव्यात बोलत खासदार शेट्टी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ''शेतकरी सन्माना यात्रा'' शनिवारी देऊळगाव मही येथे पोहचली. याठिकाणी जाहीर सभा झाली. या वेळी शेट्टी म्हणाले, संकटात सापडलेल्या, खचलेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ही सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. ही लढाई व्यवस्था परिवर्तनाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com