मुंबई : लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार म्हणजे कचरा व आम्ही तेवढे ‘शाणे’ या स्वप्नरंजनातून नोकरशाही बाहेर पडेल तेवढे बरे, असे सांगत एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या वर्तनाचे समर्थन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आले आहे. शिवसेनेने म्हटले आहे की, "नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा हे एक सज्जन गृहस्थ आहेत. त्यांच्या शिस्त पर्वाचे आम्ही स्वागत करीत आहोत, पण लोकांनी निवडून दिलेल्या नेत्यांची सोशल मीडियावर बदनामी करणे हे एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापकांचे वर्तन शिस्तीच्या कोणत्या चौकटीत बसते? एअर इंडियाच्या शिस्तीची व्याख्या काय? याबाबत संदर्भासहित स्पष्टीकरण देऊन सांगितलेत तर बरे होईल!"
विमानखात्याच्या राज्यमंत्र्यांनी आता असे बजावले आहे की, विमानांत बेलगाम वर्तन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री सिन्हा यांच्या इशाऱ्याचे आम्ही स्वागत करीत आहोत. बेशिस्त लोकांना शिस्त लावल्याशिवाय देशाचा गाडा रुळावर येणार नाही व त्यासाठी अनेकदा हाती ‘हंटर’ घेऊनच बसावे लागते, पण शिस्तीच्या बाबतीत एअर इंडियास प्रा. रवींद्र गायकवाड प्रकरणानंतर जाग आली आहे, असे सांगत त्याचे श्रेयही सेनेने गायकवाड यांना दिले आहे.
काय म्हटले आहे 'सामना'त?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.