'महावितरणकडे करा भरपाईची मागणी'

'महावितरणकडे करा भरपाईची मागणी'

सोलापूर - महाराष्ट्र राज्य विद्युत कायद्यानुसार शेतकऱ्यांनी महावितरणच्या उपअभियंता कार्यालयात जाऊन प्रतितास ५० रुपये नुकसान भरपाई मिळण्यासाठी लेखी अर्ज करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी विजेचे बिल न भरण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांनी अर्ज करताना त्यावर ग्राहक क्रमांक टाकावा.  प्रतितास नुकसान भरपाई ही अभियंत्यांच्या पगारातून वसूल केली जाते. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अर्ज दाखल करून सहा लाख ५० हजार रुपयांची भरपाई मिळविली आहे. संघटनेने वीजबिलासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार शेतीपंपाचा व इतर वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी वीज कायदा कलम नुसार शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. त्याशिवाय वीजपुरवठा खंडित करू नये, असे न्यायालयाने आदेश आहेत. 

महावितरणच्या वीजबिलांची होळी मंगळवारी (ता.१२) पुण्यातील शनिवारवाडा येथे करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. 
- रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com