"एटीएस'नेच दोन आरोपींना ठार केले 

"एटीएस'नेच दोन आरोपींना ठार केले 

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील फरारी आरोपी रामजी कलसंग्रा आणि रामजी डांगे यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यापूर्वीच ठार केले आहे. मुंबईवरील "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील अनोळखी मृतदेह त्यांचेच होते, असा दावा आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितचे वकील श्रीकांत शिवदे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. 

आरोपी प्रसाद पुरोहित याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान शिवदे यांनी हा दावा केला. "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतदेहांची ओळख पटली नव्हती. ते मृतदेह या दोघांचेच असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या युक्तिवादावर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला. 

मुंबईतील "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील अनोळखी मृतदेहांपैकी एकाचा मृत्यू डोक्‍याला गोळी लागल्याने; तर दुसऱ्याचा डोक्‍याला मार लागल्याने झाला, असे शिवदे यांनी न्यायालयात सांगितले. कर्नल पुरोहितने "आरडीएक्‍स' पुरवल्याचा कुठलाही ठोस पुरावा एटीएसकडे नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

"एनआयए'ने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करतानाही दुजाभाव केल्याचा आरोप पुरोहितच्या वकिलांनी केला. याच प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला निर्दोष ठरवण्यात आले आहे. मात्र, पुरोहितचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दर्शवण्यात आल्याचे शिवदे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. या प्रकरणाचा तपास सुरवातीला एटीएसने केला आणि नंतर एनआयए करत आहे. दोन्ही तपास यंत्रणांच्या तपासात फरक कसा काय, असा सवालही पुरोहितच्या वकिलांनी उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com