सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Udhav Thakare.jpg
Udhav Thakare.jpgSakal

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे (Political FIR) मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्याची तजबीज या निर्णयातून करण्यात आल्याचे दिसून येत आहेत. आज पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे केवळ तीनच मंत्री या बैठकीला उपस्थित होते. (Maharashtra Cabinet Meeeting News)

Udhav Thakare.jpg
Eknath Shinde Live: मला उमेदवारी दिली असती तर हे झालं नसतं - संभाजीराजे

विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना नेते एकथाथ शिंदे (Eknath Shinde) काही आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर गुवाहटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्यासाठी हा निर्णय घेऊन तजवीज करण्यात आल्याचे या निर्णयानंतर समोर आले आहे. सध्याचे सरकार राहिल की जाईल याची कोणतीच शाश्वती नसल्याने अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Udhav Thakare.jpg
राज्याच्या परिस्थितीवर अजित पवार दोन शब्दांत उत्तर; म्हणाले...

शिवसेनेचे काही मंत्री हे नाराज एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला शिवसेनेचे कोणकोणते मंत्री बैठकीला उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहिले होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या बैठकीला हजर नव्हते.

मला उमेदवारी दिली असती तर हे झालं नसतं - संभाजीराजे

राज्यातल्या राजकीय गदारोळावर संभाजीराजे छत्रपती यांनीही भाष्य केलं आहे. पुण्यात पालखी सोहळ्यासाठी आलेले असताना संभाजीराजे बोलत होते. मला उमेदवारी दिली असती तर हे घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. एकनाथ शिंदेंची खदखद आजची नाही, अनेक वर्षांची आहे, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com