एकबोटेंना कोठडीत घेऊन चौकशी करणार: नांगरे पाटील

Vishwas Nangre Patil
Vishwas Nangre Patil

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणात आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांनी अटक का केली नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारल्यानंतर त्यावर बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी एकबोटेंना पोलिस कोठडी घेऊन चौकशी करायची आहे, असे सांगितले.

कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य संशयित मिलिंद एकबोटे याला अटक का केली नाही? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारला. या प्रकरणी एकबोटे याला मिळालेला अंतरिम अटकपूर्व जामीन कायम ठेवण्याचाही निर्णय न्या. जोसेफ कुरियन व न्या. शांतागौडार यांच्या खंडपीठाने दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे. न्यायालयाने एकबोटेला अटक न करण्याचे कारण तसेच त्याची मध्यंतरीच्या काळात चौकशी का केली नाही? याबाबतचे प्रश्‍न विचारले. 

विश्वास नांगरे पाटील म्हणाले, की एकबोटेंना अटकपूर्व जामीन मिळून दिलासा मिळाला होता. त्याअनुषंगाने आम्हाला पोलिस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करून जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे, त्यानुसार चौदा मार्चला सुनावणीवेळी ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू.

एक जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर उसळलेल्या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाला होता व पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या प्रकरणी एकबोटे याच्यावर हिंसा भडकावल्याचा, खुनाचा प्रयत्न केल्याचा व दलितांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत. विशेष न्यायालयाने एकबोटेचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com