औरंगाबाद - पोलिस बंदोबस्तात गेला 60 ट्रक कचरा 

aurangabad
aurangabad

औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर हजारो टन कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येताच महापालिका प्रशासनाने नव्या जोमाने कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी (ता. 17) पहाटेपासून 60 ट्रक कचरा उचलून चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रात टाकण्यात आला आहे. पडेगाव येथे विरोध झाला असता, पोलिस बंदोबस्तात कचरा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शहरातील कचराकोंडीला पाच महिने पूर्ण झाले आहेत. अद्याप रस्त्यावर हजारो टन कचरापडून आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, माशांचा त्रास वाढल्यामुळे रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर कंट्रोल रूम तयार केल्यानंतर आता कचरा उचलण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी (ता.16) रात्रीपासून कचऱ्याच्या गाड्या भरून ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे चार वाजेपासून पडेगाव व चिकलठाणा येथे या गाड्या पाठविण्यात आल्या. पडेगाव येथे विरोध झाल्याने पोलिस बंदोबस्त घेऊन कचरा टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

पुन्हा शिवसेनेचाच विरोध 
कचऱ्याला सुरवातीपासून शिवसेनेचा विरोध होत आहे. आमदार संदीपान भुमरे यांनी सुरवात केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पिशोर येथे देखील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या गाड्या अडविल्या होत्या. मंगळवारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने कचऱ्याच्या गाड्या काही काळ अडवून धरल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com