जिल्ह्यातील ७९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले ३०१ कोटी

जिल्ह्यातील ७९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले ३०१ कोटी

औरंगाबाद - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७९ हजार २६ लाभार्थींचे ३०१ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज माफ झाले असून, ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली असल्याची माहिती बॅंकेतर्फे देण्यात आली आहे. या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्या माध्यमातून राज्य सरकारने कर्जमाफीच्या ३०१ कोटी ७१ लाख रुपयांची रक्‍कम लाभार्थींच्या खात्यात जमा केली आहे. या योजनेमध्ये ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीत असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये; तर २०१५ ते १७ या कालावधीत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान १५ ते २५ हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येणार आहे. यात १९ हजार ८२३ थकीत शेतकऱ्यांना ५२ कोटी ३२ लाख रुपये; तर पुनर्गठन केलेल्या ३७५ शेतकऱ्यांना १ कोटी ५० लाख रुपये व नियमित कर्जफेड करणाऱ्या ३३ हजार २१ शेतकऱ्यांना ४६ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून, ते त्यांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com