जायकवाडी धरण निम्म्याच्या वर भरले; पाण्याचा ओघ वाढला

जायकवाडी धरण निम्म्याच्या वर भरले; पाण्याचा ओघ वाढला

औरंगाबाद : जायकवाडी धरणात काल रविवार (ता.20) पासून वरच्या धरणातून पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) दुपारपर्यंत 56.91 टक्‍के इतका पाणीसाठा झाला होता.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारपासून वरच्या धरणातुन पाण्याचा ओघ सुरु झाला आहे. सोमवारी (ता.21) सकाळी आठ वाजेपर्यंत 1212.96 फूट म्हणजेच 461.150 मीटर इतकी पाणीपातळी झाली होती.

धरणात 1223.738 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा होता तर 56.36 टक्‍के पाणी साठा झाला होता. दुपारी एक वाजता घेतलेल्या नोंदीनुसार 1513 फूट म्हणजेच 461.190 मीटर इतकी पाणीपातळी झाली होती. धरणात 1235.18 दशलक्ष घनमीटर इतका जिवंत पाणीसाठा होता तर 56.91 टक्‍के पाणी साठा झाला होता. दुपारी 1 वाजेपर्यंत 17 हजार 777 क्‍युसेक्‍स वेगाने पाण्याची आवक होती.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com