'कर्जमाफी जमा होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागणार'

'कर्जमाफी जमा होण्यासाठी आणखी पंधरा दिवस लागणार'

औरंगाबाद - कर्जमाफीच्या अर्जांची छाननी सुरू असून आगामी पंधरा दिवसांनंतर कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच विरोधकांजवळ बोलण्यासाठी काहीच मुद्दे नसल्यामुळे ते काहीही बोलत असल्याची टिप्पणीही त्यांनी केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी (ता. 18) श्री. खोत यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, की यापूर्वी कर्जमाफी केली. तेव्हाही पैसे मिळायला एक वर्ष लागले होते. त्यामुळे आपल्यालाही वेळ लागत आहे. अर्जांची छाननी सुरू असून पंधरा दिवसांनी पैसे मिळतील. दरम्यान, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारायला हवी, असे वक्‍तव्य केले. याबद्दल विचारले असता, नगर आणि पैठण तालुक्‍यात शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार समर्थनीय नसून चर्चेतून प्रश्न सुटले पाहिजेत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते; मात्र बाहेरच्या लोकांनी पेटवल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही खूप चांगले काम करतोय; पण शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक विनाकारण सरकारवर टीका करीत आहेत. अंमलबजावणीमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागतो. आघाडी सरकारच्या काळातही कर्जमाफी अंमलबजावणीसाठी वर्ष लागले होते, असा दावाही त्यांनी या वेळी केला. 

शेट्टी दूर्योधनाच्या नजरेतून पाहतात 
सीतेच्या शोधासाठी हनुमान म्हणून गेलेले खोत परत आलेच नाहीत. या खासदार राजू शेट्टी यांच्या टीकेसंदर्भात विचारले असता, दूर्योधनाच्या नजरेतून सगळ्यांना पाहत असल्याने त्यांना वाईटच दिसते. त्यांनी जर धर्मराजाच्या नजरेतून पाहिले तर मीही चांगला दिसेल, असे श्री. खोत म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com