दोन दिवसांत अठराशे क्विंटल रताळी, बटाट्यांची आवक

दोन दिवसांत अठराशे क्विंटल रताळी, बटाट्यांची आवक

औरंगाबाद - आषाढी एकादशीला रताळी, बटाट्यांची जवळपास चौपट मागणी असते. त्यामुळे शनिवारी (ता. एक) आणि रविवारी (ता. दोन) औरंगाबाद बाजार समितीत दोन दिवसांत १३०० क्विंटल बटाटे, तर ५०० क्विंटल रताळींची आवक झाली. बाजार समितीत बटाटा दर ६ रुपये, तर रताळी १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली. 

आषाढी एकादशी मंगळवारी (ता. चार) आहे. आषाढीनिमित्त अनेकांचा उपवास असतो. उपवासाच्या दिवशी फळांसोबत सर्वाधिक मागणी रताळी, बटाट्यांना असते. बाजार समितीत शनिवारी (ता. एक) बटाट्यांची ७९९ क्विंटलची आवक झाली. याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर हा ६०० रुपये क्विंटल राहिला. रविवारीही बटाट्यांची पाचशे क्विंटलची आवक झाली. बाजार समितीत शनिवारी २०५ क्विंटल रताळींची आवक झाली. याला १२०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. सर्वसाधारण दर हा १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. बाजार समितीत दर स्वस्त असल्याने किरकोळ बाजारातही दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com