परतीच्या पावसाने माजलगाव धरण शंभर टक्के भरले

परतीच्या पावसाने माजलगाव धरण शंभर टक्के भरले

माजलगाव (जि. बीड) - परतीच्या दमदार पावसामुळे माजलगाव धरण आज शंभर टक्के भरले.  त्यामुळे माजलगाव शहरासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असुन रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी मिळणार  आहे.  

यंदा पावसाळ्याच्या सुरूवातील जुन महिन्यात पाऊस झाला. परंतु, जुलै, आॅगस्ट दोन महिने कोरडे गेल्याने कापुस, सोयाबीन, मुग, उडीद यासह खरिप हंगामतील पिके शेतकऱ्यांच्या हातातुन गेली. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी कापुस पिक जोपासले होते.

परतीच्या झालेल्या दमदार पावसामुळे तसेच जायकवाडी धरणातुन कॅनाॅलव्दारे सुरू असलेल्या पाण्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत गेली. आज (ता. २४)  माजलगाव धरणाची पाणी पातळी ४३१.८० मिटर झाल्याने 100 टक्के भरले आहे. या धरणातुन बीड व माजलगाव शहरांसह ११ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com