'पुनर्वसित गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा'

majalgaon
majalgaon

माजलगाव (जि. बीड) : शहरालगतच असलेल्या अकरा पुनर्वसित गावामध्ये ऐन सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा  ग्रामपंचायतीने पाणीपट्टी थकविल्याने कारणावरून अकरा नगर पालिकेने बंद केला आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग 222 वर खानापुर बसस्थानकासमोर आज (ता. 20 बुधवारी) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळंकेंसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. शहरालगतच असलेल्या खानापुर, शेलापुरी, रेणापुरी, ब्रम्हगांव, चिंचगव्हाण, देवखेडा, पुनंदगांव, नागझरी, नांदुर, काडीवडगांव या पुनर्वसित गावांचा नगर परिषदेने वरिल ग्रामपंचायतीने थकीत पाणीपट्टी कर न भरल्याने पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी राष्ट्ीय महामार्गावर आज रास्ता रोको करण्यात आले.

मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार आर. व्ही. कुलकर्णी यांना देण्यात आले. या आंदोलनात माजी मंत्री प्रकाश सोळंके, चंद्रकांत शेजुळ, विजय अलझेंडे, कल्याण आबुज, अर्जुन नाईकनवरे, दत्ता कांबळे, मधुकर कांबळे सहभागी झाले होते. दरम्यान या आंदोलन महिला घागर, व हंडे घेउन सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com