भाजपकडून लोकांची दिशाभूल - राज ठाकरे

भाजपकडून लोकांची दिशाभूल - राज ठाकरे

जालना - अनेक वर्षांच्या खंडानंतर भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे त्यांना देशातील जटिल प्रश्न मार्गी लावण्याची चांगली संधी होती; परंतु त्यांनी केवळ घोषणाबाजी करून लोकांची दिशाभूल करत मूळ प्रश्नांना बगल दिली, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली. 

पक्षबांधणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी (ता. २२) जालन्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप व शिवसेनेच्या दुटप्पी धोरणावर टीका केली. 

ठाकरे म्हणाले, की स्वच्छतेच्या घोषणा देणारे नरेंद्र मोदी त्यांच्या मतदारसंघातील एकही नदी स्वच्छ करू शकले नाहीत. वीज, पाण्यासह देशात अनेक प्रश्‍न आहेत. भाजपला या प्रश्नांची सोडवणूक करता आली असती; परंतु केवळ घोषणाबाजी करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे. राज्यात शिवसेनाही गोंधळलेल्या अवस्थेत आहे. इस्रोच्या अहवालानुसार राजस्थाननंतर महाराष्ट्रातही आता वाळवंट होण्याकडे मार्गक्रमण सुरू झाले आहे. राज्यात ४४ टक्के वाळवंट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री मात्र एक लाख २० हजार विहिरी बांधल्याचा दावा करत आहेत. त्या विहिरी नेमक्‍या कुठे आहेत, हे त्यांनी सांगावे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत.
- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com