मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा

Compensation
Compensation

औरंगाबाद - राज्यात गतवर्षी कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना गेल्या महिन्यात सरकारकडून नुकसानभरपाई देण्यात आली. त्यापाठोपाठ आता वर्ष २०१६ मध्ये काही भागात झालेली अतिवृष्टी, तर काही भागात अपुऱ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाईही सरकारने दिली असून, त्यासाठी मराठवाड्याला ४१९ कोटी ९८ लाख एवढा निधी वितरित केला आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना बोंडअळीच्या मदतीनंतर सरकारने पुन्हा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

वर्ष २०१६ च्या खरीप हंगामात पिके जोमात आली असताना पावसाने दगा केला होता. त्यात जीही पिके जगली ती नंतर झालेल्या अतिवृष्टीने उद्‌ध्वस्त झाली होती. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्यामुळे ९ ऑक्‍टोबर २०१७ ला शासनाने मदतीचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शासनास आवश्‍यक निधीची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. १९) शासनाने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ५१५ कोटी २४ लाख एवढा निधी वितरित केला. अपुरा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले होते. त्यामुळे आठ जिल्ह्यांसाठी ४९९ कोटी ९८ लाख एवढा निधी सरकारने दिला आहे.

शासनाच्या बॅंकांना पुन्हा सूचना
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती तसेच पीकविम्याची रक्कम देताना सरकारने ही रक्कम कर्ज खात्यात वळती न करण्याच्या सूचना बॅंकांना दिल्या होत्या; मात्र तरीसुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे कर्ज खात्यात वळती करण्यात आले आहेत. ही मदत देतानाही शासनाने बॅंकांना शेतकऱ्यांचे पैसे कर्ज खात्यात वळती न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com