पॅकेज नव्हे, विकासाचा कालबद्ध आराखडा
औरंगाबाद - मराठवाड्याच्या विकासासाठी कालबद्ध आराखडा तयार केला असून टप्प्याटप्प्याने विकासाची गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. या आराखड्यानुसार विविध कामांसाठी ४९ हजार २४८ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याचे फलित आगामी काळात दिसेल. हा निधी म्हणजे आर्थिक पॅकेज नाही तर मराठवाड्याच्या विविध प्रश्नांना चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
तब्बल आठ वर्षे न झालेली आणि होणार होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली मंत्रिमंडळाची बैठक येथील विभागीय आयुक्तालयात झाली. सकाळी अकरा ते सव्वादोनपर्यंत चाललेल्या बैठकीतील निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री बोलत होते. कालबद्ध आराखड्यातील काही योजना पुढील वर्षी, काही दोन वर्षांत, तर काही चार वर्षांत पूर्ण होतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तीव्र दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची चर्चा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याही विषयाला स्पर्श केला. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील दहा लाख हेक्टरवरील सोयाबीन आणि पाच लाख हेक्टरवरील कपाशी, तूर व इतर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेद्वारे मदत दिली जाईल. मराठवाड्यातील ७८ टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून, त्यांना हा लाभ मिळेल. उर्वरित २२ टक्के शेतकऱ्यांनाही मदत दिली जाईल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. अतिपावसामुळे वाहून गेलेली जमीन, रस्ते-पुलांचे नुकसान आदींची माहिती घेतली जात असून तातडीने पुढील कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
वर्षभरात सर्व प्रश्न सुटतील, असा दावा नाही. मराठवाड्याच्या विकासासंदर्भात दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्याच्या भविष्याची वाटचाल ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. बैठकीत ४९ हजार २४८ कोटी रुपयांचे निर्णय घेतले असून, हे पॅकेज नसून कालबद्ध कार्यक्रम आहे. सर्व जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे होतील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आराखड्यातील कामे व तरतुदी अशा -
सिंचन
प्रशासकीय
विमानतळ
रेल्वे
घरकुल
रस्ते
सूक्ष्म सिंचन
आयसीटी, ग्रीन आर्मी बटालियन
शिक्षण
आरोग्य
वॉटर ग्रीड योजना
जिल्ह्यांसाठी काय?
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.