औरंगाबाद: दुसऱ्या दिवशीही कचऱ्याच्या गाड्या अडविल्या 

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद : पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर कचरा टाकण्यास सलग दुसऱ्या दिवशीही बुधवारी (ता.18) नागरिकांनी सकाळपासूनच विरोध सुरू झाला आहे. नागरिकांनी महापालिकेच्या कचऱ्याने भरलेल्या ट्रक अडवत रस्त्यावर ठिय्या मांडल्याने महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. 

शहरात पडून असलेला कचरा भिजून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असल्याने महापालिका दोन दिवसांपासून शहरातील कचरा पडेगाव परिसरात प्रक्रिया केंद्रावर टाकत आहे. मात्र कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने नागरिकांनी मंगळवारी (ता. 17) कचऱ्याच्या गाड्यांवर दगडफेक करून विरोध दर्शविला होता. मात्र, नंतर पोलिस बंदोबस्तात दिवसभरात सुमारे पन्नास ट्रक कचरा टाकण्यात आला. त्यानंतर बुधवारी देखील नागरिक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच कचऱ्याच्या गाड्या अडकविल्या आहेत. सध्या पडेगाव येथे परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या देऊन बसले असून, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारपर्यंत तिढा सुटला नव्हता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com