यंदा हापूस आवाक्‍याबाहेरच 

hapus_mango
hapus_mango

औरंगाबाद - एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून शहर व परिसरात आंब्याची आवक सुरू झाली आहे; मात्र वादळी पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आवक घटली असल्याचे चित्र असून, औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात प्रतिदिन सरासरी तीन ते साडेतीन पेट्यांची (चार डझन आंबे) आवक होत आहे. बाजार समितीशिवाय थेट विक्रीसाठी आलेल्या आंब्याची संख्याही तेवढीच आहे. दरम्यान, सर्वच प्रकारच्या हापूसचे दर वधारल्याने ग्राहक गोटी आंबा आणि ‘गोटी’ आणि ‘पायरी’ आंब्याला पसंती देत असल्याचे चित्र आहे.   अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शहरात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल झाला होता. अद्यापपर्यंत तरी आंब्याचे दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आजही आवाक्‍या बाहेरच आहेत. दरम्यान, विक्रीसाठी आलेल्या आंब्यामध्ये रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री करण्यात येत असल्याचे बहुतांश ग्राहकांनी सांगितले. देवगड, रत्नागिरी हापूसला ग्राहकांची चांगली मागणी आहे. याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांनी केला आहे. 

यंदा अवकाळी पावसामुळे हापूसची बऱ्यापैकी आवक घटली आहे. दोन-तीन दिवसांपासून बाजारपेठेत दरही वधारले आहेत. कमी आवक असल्यामुळे बाजारपेठेवर थेट परिणाम दिसून यायला सुरवात झाली आहे. येत्या काळात साधारणतः मेमध्ये आवक वाढल्यानंतर दर आवाक्‍यात येतील.
-आकाश बद्रोदीन, हापूस विक्रेते.

आंब्याचे दर (डझन)
देवगड हापूस आंबा-   ६०० ते ७०० रुपये
रत्नागिरी हापूस  - ५०० ते ६००
कर्नाटक हापूस  - २५० ते ३००
गोटी आंबा - १५० ते २००
पायरी - २०० ते ३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com