दोन वर्षांत ३८ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते

दोन वर्षांत ३८ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते

लातूर - राज्यात येत्या दोन वर्षांत राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गाच्या माध्यमातून ३८ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते होतील. हे रस्ते दर्जेदार होण्यासाठी सर्वच अभियंत्यांनी आपल्या स्वतःच्या घराचे बांधकाम आहे, असे समजून या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष द्यावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली.

जिल्ह्यातील रस्त्यांचा आढावा श्री. पाटील यांनी बुधवारी रात्री घेतला. या वेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, उपस्थित होते.  महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेण्यात आले आहे. ३४ पैकी २२ जिल्ह्यांचा दौरा मी केला आहे. गेल्या अनेक वर्षांत रस्ते कधीच दुरुस्त झाले नाहीत. पावसाळ्यात खड्डे पडतात व नंतर ते बुजविले जातात. पंधरा वर्षे खड्डा पडणार नाही अशी कामे कधीच झाली नाहीत. याचा हा परिणाम आहे. आजही रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे हे अभियान हाती घेण्यात आले आहे. १५ डिसेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजविले जातील मंत्री पाटील अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान बीडमध्येही त्यांनी आढावा बैठक घेतली.

मुंबईत वॉर रूम
रस्त्यांबाबत मुंबईत एक वॉर रूम तयार करण्यात आली आहे. राज्यातील कंत्राटदार सहकार्य करणार नसतील तर परराज्यांतून कंत्राटदार आणण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत दोन हजार अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली, तर २०० जणांना निलंबित केले. आम्ही शाबसकीही देत आहोत अन्‌ शासनही करीत आहोत. ता. १५ डिसेंबरनंतर पुन्हा मी राज्याचा दौरा करणार आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यातील ५० अधिकाऱ्यांचा गौरवही करणार आहोत, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com