औरंगाबाद जिल्ह्यातील ९६ गावे टॅंकरवर

Water-Tanker
Water-Tanker

औरंगाबाद - उन्हाचे चटके जाणवण्यास सुरवात होताच जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळाही सुरू झाल्या आहेत. यावर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा अधिक गंभीर परिस्थिती उद्‌भवण्याची चिन्हे आहेत.

आजघडीला जिल्ह्यातील ९६ गावे पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून असून, या गावांना १२० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षी मराठवाड्यातील सुरू असलेल्या एकूण टॅंकरपैकी अर्धे टॅंकर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात सुरू होते. यावर्षीही ही परिस्थिती कमी होण्याऐवजी अधिक वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. उन्हाळा सुरू होताच जिल्ह्यातील ९६ गावांना १२० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजून तीन महिने ही परिस्थिती राहणार असल्याने या कालावधीत प्रशासनापुढे पाणीटंचाई निवारणाचे मोठे संकट उभे राहणार आहे.

तीन तालुक्‍यांत सर्वाधिक पाणीटंचाई
जिल्ह्यात मागील वर्षी सर्वाधिक पाणीटंचाई फुलंब्री, गंगापूर आणि सिल्लोड या तालुक्‍यांत होती. यंदाही या तालुक्‍यांत परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण टॅंकरपैकी ९३ टॅंकर या तालुक्‍यात सुरू आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या परिस्थितीचा अंदाज घेत प्रशासनाला त्यावर मात करता आलेली नाही, हे यावरून स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com