कर्जमाफी नव्हे, ही तर शेतकऱ्यांच्या लुटींची वापसी: रघुनाथदादा पाटील

Raghunath Patil
Raghunath Patil

औरंगाबाद, : आघाडीच नव्हे तर युती सरकारनेही सत्ता मिळताच शेतकऱ्यांना लुटण्याचेच काम केले. अनेक दिवस सत्ता भोगून शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारेच आता हल्लाबोल आंदोलने आहेत, अशी बोचरी टिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता केली. तसेच शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी नव्हे, तर लुटींची वापसी असल्याची टिकाही त्यांनी केली. 

सुकाणू समितीची येत्या शुक्रवारी (ता. 22) शहरात बैठक होणार आहे. यासह शेतकऱ्यांशी चर्चा करून आपली भूमिका मांडण्यासाठी श्री. पाटील शहरात आले होते. शुक्रवारी (ता. 15) सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य सरकारने केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी ही फसवी आहे. प्रत्यक्षात ही कर्जमाफी नसून गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची केलेल्या लुटींची वापसी आहे.

स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी नूसार शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा असा भाव देण्याचे आश्वासन भाजप सरकारने निवडणूकीत केले होते. त्यावर विश्‍वास ठेवून शेतकऱ्यांनी भाजपाला मते दिली. मात्र, मात्र, या सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला आहे. त्यामुळे देशात आघाडी सरकार असो की आताचे भाजप सरकार असो, त्यांच्या धोरणामुळेच शेतकरी कर्जबाजारी होत असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी कालीदास आपेट, निलेश बारगळ, दिनकर दाभाडे, चाटे उपस्थित होते. 

मागीतला हमीभाव, तर देताहेत कमीभाव 
देशभर शेतात पिकणाऱ्या भाजीपाला, अन्नधान्य, फळांची रेलचेल आहे. हे उद्योगपती नव्हे शेतकरीच पिकवतो ना. मग तरीही त्याच्यावरच आत्महत्या करण्याची वेळ कुणी आणली. आतापर्यंत शेतमालास कसे भाव दिले. याचा पाढाच श्री. पाटील यांनी वाचून दाखवला. आघाडी सरकारच्या म्हणजे 2006-2007 ते 2013-14 या काळात शेतकऱ्यांच्या कोणत्याही मालास उत्पादन खर्चाएवढाही भाव दिलेला नाही. हे सरकारही तोच पत्ता गिरवत आहे. हमी भाव सोडा उत्पादन खर्च सुद्धा मिळाला नसल्याची सरकारी आकडेवारीच त्यांनी समोर ठेवली. हमीभाव देण्याचे जाहीर केलेले असतानाही कमीभाव देण्याचेच काम सुरु आहे. 

लवकरच देशात तिसरा पर्यायी पक्ष 
शेतकरी विरोधी कायदे मोडीत काढण्यासाठी आजतागायत कुठल्याही पक्षाने प्रयत्न केलेले नाहीत. न्यायालये दहीहंडीच्या थराची मर्यादा घालून देऊ शकते. मात्र, शेतकरी विरोधी धोरणावर निर्णय घ्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी तिसरा पर्याय उभा केला जात आहे. देशभरातील शेतकरी नेत्यांना एकत्र आणत येत्या ऑगस्टपर्यत नवा पक्ष स्थापन केला जाईल. तसेच आगामी 2019 च्या निवडणूकीत देशभर नव्या पक्षाचे उमेदवार निवडणूकही लढतील, असेही श्री. पाटील यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com