इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यात आठजण रस्टिकेट

बीड - बोर्डाची परीक्षा म्हटली, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अनामिक भीती असते. अशीच भीती या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरही होती. मात्र, पेपर संपल्यानंतर याच विद्यार्थिनी चंपावती विद्यालयाच्या केंद्रातून अशा प्रसन्न मुद्रेने बाहेर पडल्या.
बीड - बोर्डाची परीक्षा म्हटली, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात अनामिक भीती असते. अशीच भीती या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरही होती. मात्र, पेपर संपल्यानंतर याच विद्यार्थिनी चंपावती विद्यालयाच्या केंद्रातून अशा प्रसन्न मुद्रेने बाहेर पडल्या.

बीड - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील ९० केंद्रांवर बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली. जिल्ह्यात बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला कॉपी करताना आढळलेल्या ८ परीक्षार्थींवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाने कॉपी रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने ही कारवाई केल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी दिली.

मागील पाच वर्षांपासून बारावी परीक्षेत औरंगाबाद विभागात अव्वल ठरलेल्या बीड जिल्ह्यातील ९० केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडत आहे. परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३८ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे नोंदणी केलेली आहे. बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर बुधवारी पार पडला. ११ ते २ या वेळेत झालेल्या या पेपरदरम्यान विविध ठिकाणी मिळून एकूण ८ परीक्षार्थी कॉपी करताना भरारी पथकाला आढळून आले. कॉपीबहाद्दर सदर आठही विद्यार्थ्यांवर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली आहे. गेवराई तालुक्‍यातील मादळमोही येथील मोहिमाता विद्यालय या परीक्षा केंद्रावर तिघांवर ही कारवाई करण्यात आली. याशिवाय बीड तालुक्‍यातील शिवणी येथील केंद्रावर दोघांना, तर ढेकणमोहा येथील केंद्रावरील एका विद्यार्थ्याला रस्टिकेट करण्यात आले. परळी तालुक्‍यातील सिरसाळा येथील एकाल,त्तिर आष्टी तालुक्‍यात एका परीक्षार्थीला रस्टिकेट करण्यात आले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांनी बीड तालुक्‍यात तिघांना रस्टिकेट केले. याशिवाय प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री. गायकवाड व उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली.

पहिल्याच पेपरला जिल्ह्यात ८ जण कॉपी करताना आढळल्याने कॉपीमुक्तीचा बोजवारा उडाल्याचे बोलले जात आहे.

गैरहजर परीक्षार्थींची माहितीच उपलब्ध नाही
परीक्षेनंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी बारावी परीक्षेसंदर्भात माहिती घेतली असता शिक्षण विभागाने पेपरला किती विद्यार्थी गैरहजर होते अन्‌ किती परीक्षार्थी प्रत्यक्षात उपस्थित होते? याबाबतची कोणतीही माहिती घेतली नसल्याचे सांगण्यात आले. नोंदणी केलेल्या एकूण परीक्षार्थींपैकी किती परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली याची माहिती शिक्षण विभागाकडेच उपलब्ध नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा नियंत्रण कक्षालाही सदर माहिती घ्यावी, अशी इच्छा नसल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात बारावीची परीक्षा शांततेत सुरू झाली आहे. पेपरला केंद्रावर जाण्यापूर्वीच केंद्राच्या गेटवरच परीक्षार्थींची तपासणी होत असल्याने चांगले परिणाम दिसून येत आहेत. याशिवाय परीक्षार्थींसह पालकांची केंद्रावर मोठी गर्दी होत असली, तरी पोलिसांचे चांगले सहकार्य मिळाल्याने पेपरदरम्यान कोठेही गडबड आढळून आली नाही. 
- भगवान सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com