मराठवाड्यासाठी 499 कोटींची भरपाई 

Rs 499 crore compensation for Marathwada
Rs 499 crore compensation for Marathwada

लातूर- राज्यात 2016 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन वर्षांनंतर आता राज्य शासनाने नुकसानभरपाईसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यात पाच लाख 98 हजार 187 हेक्‍टरला याचा फटका बसला होता. याकरिता शासनाने 499 कोटी 18 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. 

राज्यात उन्हाळ्यात अवकाळी पाऊस व पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती. नुकसान होऊन दोन वर्षे झाली, तरी मदत मिळत नव्हती. शेतकऱ्यांकडून वारंवार भरपाईची मागणी होत असल्याने नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी आवश्‍यक निधीची मागणी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडून केली जात होती. याची दखल घेत आता दोन वर्षांनंतर सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. मराठवाड्यातील 21 लाख 50 हजार 284 शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका बसला होता. बाधित शेतकऱ्यांपैकी पीकविमा न घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या आठ लाख 95 हजार 929 आहे. अशा शेतकऱ्यांचे एकूण बाधित क्षेत्र पाच लाख 98 हजार 187 हेक्‍टर होते. या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 499 कोटी 18 लाख 89 हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

वसुली करू नका 
महसूल व कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्याच्या आधारे पिकांचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात ही रक्कम जमा होईल. आधार क्रमांक नसेल, तर इतर ओळखपत्रांची खातरजमा करून रक्कम द्यावी; तसेच या रकमेतून कोणत्याही बॅंकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेश गुरुवारी (ता. 19) सरकारने दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com