Sahitya Sammelan : संयुक्त महाराष्ट्रासाठी उपसभापती आग्रही

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या लाखो मराठी भाषिकांची महाराष्ट्राशी जोडलेली नाळ आजही कायम आहे.
Dr Neelam Gorhe
Dr Neelam GorheSakal
Summary

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या लाखो मराठी भाषिकांची महाराष्ट्राशी जोडलेली नाळ आजही कायम आहे.

उदगीर - महाराष्ट्राच्या निर्मितीपासून महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या लाखो मराठी भाषिकांची महाराष्ट्राशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी व कारवारसह संयुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, याकरिता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या आग्रही आहेत. यातून त्यांनी उदगीर येथे सुरू असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांना साकडे घातले आहे. ठरावासाठी एक पत्रही दिले आहे.

उदगीर हा सीमावर्ती भाग आहे. उद्‍घाटनाच्या कार्यक्रमात देखील सीमावर्ती भागाचा प्रश्न सुटावा, अशी मागणीही करण्यात आली. या संमेलनात रविवारी (ता. २४) एक परिसंवाद होत असून `सीमाभागात अडकलेल्या मराठी समाजाला भारत सरकार अजून किती दिवस कुजवणार?` हा त्याचा विषय ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागांमध्ये राहणाऱ्या लाखो मराठी भाषिकांची महाराष्ट्राशी जोडलेली नाळ अजूनही अबाधित आहे. तेथील जनतेला मराठी साहित्य, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा या सर्वांचा जाज्वल्य अभिमान मनाशी बाळगून हे मराठी भाषिक महाराष्ट्रात घ्यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे करीत आहेत.

या पार्श्वभूमीवर सीमा भागात राहणाऱ्या मराठीजनांची भावना लक्षात घेऊन आणि त्यांची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्राचा काही कारणांमुळे दूर गेलेला हा भाग पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जोडला जावा आणि त्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र पुन्हा एकदा अस्तित्वात यावा, यासाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. या संमेलनात बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी व कारवारसह संयुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने ठराव मांडावा. याबाबत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव मांडण्याची विनंतीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

उदगीर जिल्हा निर्मितीचा ठराव होणार

संमेलनादरम्यान पालकमंत्री अमित देशमुख यांनी उदगीर जिल्हा निर्मितीचा चेंडू ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात टाकला. पण आता या संमेलनात उदगीर जिल्हा निर्मितीचा ठराव घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रमुख कार्यवाह रामचंद्र तिरुके यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com