कल्याण - बदल्या होऊनही अधिकारी पालिकेतच..

KDMC
KDMC

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालावधी संपल्यावर त्यांची बदली करण्यात येते. परंतु त्यानंतरही हे अधिकारी पालिकेत सेवा बजावत असल्याचे दिसून येत आहे. प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने कक्ष संवर्गातील अधिकारी मिलींद धाट यांची मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरसकर यांची बदली झाली आहे. मात्र त्यानंतरही हे अधिकारी पालिकेतच सेवा करत आहेत. 

राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी पालिकेत प्रति नियुक्तीवर येतात. त्यांचा दोन वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यावर शासन आदेशानुसार त्यांची बदली करण्यात येते. या पत्रानुसार त्यांनी त्वरित नियुक्ती झालेल्या जागी रुजू व्हावे अन्यथा ते रुजू होईपर्यंत त्यांच्या सेवेत खंड समजला जाईल असे बदलीच्या आदेशात म्हटले जाते. परंतु कडोमपामधील उपायुक्त धनाजी तोरसकर आणि मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण यांची बदली होऊन काही कालावधी लोटला असूनही ते पालिकेतील आहेत. मग यांच्या सेवा खंडित झालेल्या का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान पालिकेतील मिलींद वाट यांचीही मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. ते आता आपल्या नियुक्तीच्या जागी कधी रुजू होणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या कामावर लोक प्रतिनिधी कायमच नाराजी व्यक्त करत असतात. त्यांना राज्य शासनाच्या सेवेत परत पाठवले जावे असा आग्रह करत असतात. मात्र शासनाने बदली केल्यानतरही जे अधिकारी पालिकेत सेवा बजावत आहेत त्यांच्याबाबत कोणतेही भाष्य केले जात नाही हे वास्तव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com