‘कॅग’च्या ताशेऱ्यांकडे दोन वर्षांपासून दुर्लक्ष

Government
Government

मुंबई - अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला किंवा नाही याबाबत सादर करावयाच्या उपयोगिता प्रमाणपत्राबाबत दोन वर्षांपासून प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे आगामी काळात सरकारवर महालेखा परीक्षकांकडून (कॅग) पुन्हा ठपका ठेवला जाण्याच्या शक्‍यतेमुळे अर्थ विभागाने संबधित विभागांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती अर्थ विभागातील सूत्रांनी दिली.

अर्थसंकल्पातील निधीतून केलेल्या कामांचा तंतोतंत तपशील ठेवण्याची जबाबदारी प्रशासकीय विभागांची आहे. तसेच, वर्षभरात खर्च केलेल्या निधीबाबतची उपयोगिता प्रमाणपत्रे भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल कार्यालयाकडे सादर करणे विभागांना बंधनकारक आहे. मात्र २०१३ ते २०१६ पर्यंतची उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली नसल्याने ‘कॅग’ने दोन वर्षांपूर्वीच सरकारची कानउघाडणी केली होती. यावर राज्याच्या अर्थ विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, दोन वर्षांनंतरही परिस्थिती जैसे थे आहे.

प्रमाणपत्र सादर न केलेल्या रकमा (आकडे रुपयांत)
२०१३-१४..............................२८ हजार ८५४ कोटी २१ लाख
२०१४-१५..............................६ हजार ८२४ कोटी ८१ लाख
२०१५-१६..............................२७ हजार ४१० कोटी २० लाख 
एकूण...................................    ६३ हजार ८९ कोटी २२ लाख
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com