मुरबाड नगरपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे नदीत घाणिचे साम्राज्य 

murbad
murbad

सरळगांव - गणपती विसर्जनानंतर स्वच्छता करण्यास मुरबाड नगरपंचायत फेल. स्वच्छतेचा नारा देणा-या मुरबाड नगरपंचायतीचा स्वच्छतेचा नारा फोल ठरल्याने जनतेकडून संत्ताप व्यक्त केला जात आहे. आरोग्याच्या प्रश्नावर नगराध्यक्षा विश्वासात घेत नसल्याची खंत सभापतिंनी व्यक्त केली.     

अस्वच्छतेमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बद्दल मिळालेली माहीती अशा की, मुरबाड नगरपंचायतीने गणपती उत्सवात गणेश भक्तांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे असे आव्हान मोठ्या दिमाखात केले होते. गणपती उत्सवात गणपती विसर्जनाच्या वेळी नदीघाटावर स्वच्छता राखली जाईल व निर्माल्य गोळा करण्यासाठी खास करून सोय केली जाईल असे जाहीर करून या कामासाठी जनतेच्या टॅक्स मधून मिळाले हजारो रूपये खर्चही केले. मात्र गणपती विसर्जनाच्या तीस-या  दिवशीही नद्दीवर निर्माल्य पाण्यावर व नदी पात्राजवळ मोठ्या प्रमाणात तरंगत असल्याने या ठिकाणी दुर्गधीचे साम्राज्य झाले. या नदीचे पाणी 7 ते 8 गावे पाणी वापरत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बद्दल नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भूसे यांना विचारले असता. दोन दिवसात नदी तीरावरची स्वच्छता करण्यात येईल असे सांगितले. मात्र विसर्जन सोमवार 17 संप्टेबर रोजी झाले असतानाही व स्वच्छतेसाठी हजारो रूपये खर्च केले असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

या चार दिवसात निर्माल्य पाण्यात तसेच पडून राहिल्याने या नद्दीवर पाणी वापरणा-यांचे आरोग्य धोक्यात आणणा-या नगरपंचायतीवर आरोग्य खात्याने चौकशी करून कारवायी करावी अशी मागणी होत आहे. 

स्वच्छते साठी 80 हजार रूपये खर्च- 
नदी तीरावर लाईटचे सहा फोकस, एक छोटासा फळ्यांचा स्टेज व ऐक कापड लाऊन केलेली कमान येवढ्याच कामासाठी  नगरपंचायतीने जनतेच्या टॅक्स मधून जमा झालेल्या पैशातून  80 हजार रूपये खर्च केल्याची चर्चा होत असल्याने संत्ताप व्यक्त केला जात आहे.         

आरोग्य समितीच्या सभापतीला ठेवले अंधारात
मुरबाड नगरपंचायतीच्या आरोग्य समितीचे सभापती रविंद्र देसले यांना या निष्काळजीपणा बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की गणपती विसर्जनाच्या वेळी आरोग्याच्या दृष्टीने कोणती उपाय योजना करावयाची आहे.याची कोणतीही कल्पना नगराध्यक्षा शीतल तोंडलिकर यांनी न देताच त्यांनी परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले. मी आरोग्य समितीचा सभापती असतानाही नगराध्यक्षा मनमानी करून निर्णय घेत असल्याची खंत ही सभापती रविंद्र देसले यांनी व्यक्त केली. 

निर्माल्य व कूजलेली फळे पाण्यात टाकल्यास पाणी 100 टक्के दूषित होणार
निर्माल्य व खराब झालेली फळे नद्दीच्या पाण्यात जास्त दिवस राहिल्यास 100 टक्के पाणी दुषित होणार हे दुषित पाणी पिण्यात आल्यास वेगवेगळे सातिचे आजार होऊ शकतात.या मुळे हगवण, उलटी होणे, टायफायड, असे अनेक आजार होण्याची भिती असते. निर्माल्य हे शेतात टाकल्यास त्याचा खत होऊन ते शेतीसाठी उपयुक्त ठरत असल्याने निर्माल्य व कूजलेली फळे नद्दीच्या पाण्यात टाकूच नये.
-डॉ. बनसोडे, तालुका वैद्यकिय अधिकारी मुरबाड.

मुरबाड नगरपंचायत ही स्वच्छतेच्या नावावर जनतेच्या पैशाची उधळपट्टी तर करतेच, तरी सुध्दा शहरात व शहराच्या चारी बाजूला घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. या घाणी मुळे  त्याचे, आतीसाराचे रूग्ण परेशान झाले आहेत. गणपती विसर्जनाच्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाईल असे आश्वासन नगरपंचायतीच्या वतिने दिले होते.मात्र विसर्जनाच्या चौथ्या दिवशीही नद्दीकिनारी घाणीचे साम्राज्य दिसून आले. या कामा साठी वापरलेला जनतेचा पैसा कुठे गेला याची ही चौकशी आम्ही करावयास लावणार आहोत.
-नरेश देसले, शहर अध्यक्ष मनसे.      

सर्व प्रकाराची माहीती घेण्यासाठी नगराध्यक्षा शीतल तोंडलिकर यांच्यासी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.  

नंदकिशोर मलबारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com