सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी दिलेले कर्ज माफ करा- आरपीआय युवक आघाडीची मागणी

RPI Protest
RPI Protest

कल्याण- सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायसाठी शासनाच्या विविध वित्तीय महामंडळातुन दिलेले कर्ज माफ करा अशी मागणी करत आरपीआय (आठवले गट) युवक आघाडी च्या वतीने आज मंगळवार ता 25 जुलै रोजी कल्याण तहसीलदार कार्यालय वर धड़क मोर्चा काढण्यात आला.

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला असून या धर्तीवर सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या दूर करा, अशी मागणी करत आरपीआय (आठवले गट) युवक आघाडीच्या वतीने आज मंगळवार (ता.25 जुलै) रोजी कल्याण पश्चिम आंबेडकर उद्यान ते कल्याण तहसीलदार कार्यालय धड़क मोर्चा काढला होता.

सरकारने सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी शासनाच्या विविध वित्तीय महामंडळातुन दिलेले कर्ज माफ करा, कर्जासाठी उपन्न दाखला बंद केला आहे ते सुरु करा, मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी असणाऱ्या विविध वित्तीय महामंडळाची आर्थिक मर्यादा वाढविण्यात यावी, परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असलेल्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन यावेळी शिष्टमंडळाने तहसीलदार अमित सानप यांना दिले. ह्या मागण्या शासनाकड़े पाठविल्या जातील असे आश्वासन यावेळी तहसीलदार अमित सानप यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. या मोर्चा मध्ये अन्ना रोकड़े , संग्राम मोरे , भिमराव डोळस , दासु ठोंबे , मानिक उघड़े , संतोष जाधव , विकास खैरनार , सुमित माने , संजय जाधव , सुशील मनोहर सहित शेकडो महिला पुरुष कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com