Vidhan_Parishad
Vidhan_Parishad

सरकारचे 'मुँह मे राम दिल मे नथूराम': संजय दत्त

मुंबई - कल्याणमध्ये हिंदू महासभेने जागा घेतली असून, त्या जागेवर नथूराम गोडसे स्मारक बांधण्याचा घाट घातला जात आहे.  त्यासाठी राजस्थानमधून पुतळा आणला जाणार आहे, अशी माहीती काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार संजय दत्त यांनी सभागृहात दिली. 

विधानपरिषदेत संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितले, की नथूराम गोडसे स्मारक हे कल्याणजवळ 5 किलोमीटर अंतरावर 'सापड' गावात उभारले जात आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असून 'मुँह मे राम दिल मे नथूराम' असणाऱ्या या सरकारची भूमिका दूटप्पी असल्याची टिकाही त्यांनी केली.  

राज्यात कोणाचा पुतळा उभा करायचा असेल तर त्यासाठी सरकारची परवानगी लागते, अशी परवानगी दिली जाणे शक्यच नाही. या प्रकाराशी सरकारचा काहीही संबंध नसून संपूर्ण प्रकरणाची लवकरच चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी यावर कडाडून टीका केली. खासगी जागेवर पुतळा उभारला जाणार असून त्याठिकाणी सशस्त्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा सर्व प्रकार थांबवणे हे सरकारचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com