कल्याण: कल्याण पूर्व सूचकानाका परिसर मधील महात्मा फुले नगर मधील कचरा मागील 5 दिवसात न उचल्याने मूसळधार पावसाने तो कचरा नागरिकांच्या दारात आणि काहीच्या घरात कचरा घरात घुसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमचा जीव गेल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत.
कल्याण पूर्व सूचकनाका परिसर मध्ये महात्मा फुले नगर आणि खदान परिसर मध्ये शेकडो बैठ्या चाळीची लोकवस्ती आहे. ते नागरिक पालिकेला कर देतात मात्र तेथील नागरिकाना पालिका सुविधा काय देते, असा सवाल केला जात आहे. शनिवार (ता. 24) पासून त्या परिसर मधील कचरा उचलला न गेल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच कालावधीत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने तो कचरा पावसाच्या पाण्यासहित नागरिकांच्या दारात तर काहीच्या घरात कचरा घुसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठी दुर्घटना, जीवित हानी झाल्यावर पालिका जागी होणार का? असा सवाल केला जात आहे.
प्रतिक्रिया
प्रत्येक वेळी नागरिकांनी तक्रारी केल्यावर पालिका कचरा उचलणार का? मागील 5 दिवस झाले आम्ही तक्रारी करतो आहे मात्र या समस्येकड़े लक्ष्य द्यायला वेळ नसून मोठी दुर्घटना झाल्यावर हे जागे होणार का? असा सवाल स्थानिक नागरिक मनोज वाघमारे यांनी केला आहे.
कल्याण पूर्व मधील प्रति दिन कचरा उचलला जातो, 5 दिवस कचरा उचलला गेला नसेल तर त्वरित काढला जाईल, कचरा का उचलला नाही याबाबत अहवाल मागितला जाईल, अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.