कल्याण रेल्वे पोलिसांनी पकडले 69 मोबाईल चोर

file photo
file photo

कल्याण: मध्य रेल्वेच्या कल्याण, शहाड, आंबिवली लोकल आणि मेल गाडीच्या प्रवासात प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरीच्या प्रकरणातील आरोपीना अटक करण्यात कल्याण रेल्वे पोलिसाना यश आले आहे.

गेल्या 3 महिन्यात कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे 73 गुन्हे दाखल झाले आहेत. 9 लाख 72 हजार 147 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, यात 37 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात 69 आरोपी अटक करण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे 4 लाख 80 हजार 26 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात कल्याण रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील कल्याण पत्रीपूल, शहाड, आंबिवली, कसारा रेल्वे स्थानक दरम्यान मेल आणि लोकल गाड्या मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाचे गर्दीच्या वेळी मोबाईल चोरी होण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी वर्गात संतापाचे वातावरण होते. मोबाईल चोरीला आळा घालावा, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना श्याम उबाळे यांनी कल्याण रेल्वे पोलिसांकडे केली होती. याची दखल घेत कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी विविध ठिकाणी सापळे रचून कारवाई करण्यात आली होती.

गेल्या 3 महिन्यात कल्याण पत्रिपूल परिसरातील 40 मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते त्यात 24 गुन्हे उघड झाले. यात 4 लाख 74 हजार 464 रुपयांचा माल चोरीला गेला तर 2 लाख 86 हजार 198 रुपयांचा माल पुन्हा मिळाला यात 46 आरोपीना अटक केली आहे. शहाड रेल्वे स्थानक परीसर 13 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 6 गुन्हे उघड व 1 लाख 80 हजार 989 रुपयांचा माल चोरीला तर 81 हजार 249 रुपयांचा माल पुन्हा मिळाला आहे. यातील 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आंबिवली रेल्वे स्थानक परीसरात 20 गुन्हे दाखल झाले असून, 7 गुन्हे उघड झाले आहेत. 3 लाख 16 हजार 694 रुपयांचा माल चोरीला  गेला तर पुन्हा 1 लाख 12 हजार 579 माल मिळाला यात 9 आरोपी अटक करण्यात आली आहे.

एकूण 73 गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी 37 गुन्हे उघड झाले असून, 9 लाख 72 हजार 147 रुपयांचा माल गेला यात 4 लाख 80 हजार 26 रुपयांचा माल पुन्हा मिळाला आहे. एकूण 69 आरोपी अटक करण्यात आली आहे.

चोरी करण्याची पद्धत
कल्याण पत्रिपूल, शहाड, आंबिवली रेल्वे स्थानक जवळ लोकल अथवा मेल गाडी थांबल्यास ती सुरू होण्यापूर्वी दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाश्याच्या हातावर फटका मारत मोबाईल चोरी करत होते. सकाळ किंवा सायंकाळी प्रवासी वर्गाची लोकल पकडताना धावपळ असते, यावेळी दरवाज्यात गर्दी करत बेसावध असलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरी करत. कसारा आणि कल्याण सह अन्य रेल्वे स्थानकात मेल गाड्या थांबतात त्या पुन्हा सुरू होताना अनेक प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले आहेत.

मोबाईल चोरीचे प्रकार वाढल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण होते. यामुळे यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. रेल्वे पोलिसांनी कारवाई ही केली त्यांचे अभिनंदन. मात्र, ही कारवाईमध्ये सातत्य ठेवावे, अशी मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com