कल्याणमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण...

कल्याणमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण...
कल्याणमध्ये वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण...

कल्याणः पावसाळा आणि परतीच्या मुसळधार पावसाने कल्याण पूर्व पश्चिम मधील पूल आणि रस्ते खड्डेमय झाले असून, ते दुरुस्ती न केल्याने शहरात सकाळी आणि सायंकाळी संथ गतीने वाहन चालक आपली वाहन चालवीत असल्याने शहरातील अनेक भागात वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्याने शहरातील वाहन चालक सहित नागरिक बेहाल झाले आहेत.

यावर्षी कल्याण, डोंबिवली शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडला असून, परतीच्या पावसाने ही कहर केला आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. त्यातील कल्याण अंबरनाथ बदलापूर जाणारा वालधुनी पूल, कल्याण पूर्व मधील पूना लिंक रोड, कल्याण नगर महामार्गावरील शहाड पूल, कल्याण पूर्व मधील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल आदी परिसरात भले मोठे खड्डे पडल्याने त्या परिसर मधील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याने भली मोठ्या वाहनांची रांगा लागते. सकाळी कामावर जाणारे आणि सायंकाळी घरी जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, स्टेशन बाहेरील रिक्षा ही रिक्षा स्थानकात मिळत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

उल्हासनगर आणि कल्याण मोठी बाजार पेठ
कल्याण आणि उल्हासनगर शहरात सोने, कपडे, फर्निचर, फराळ, धान्य आदींची स्वस्त आणि मोठी बाजार पेठ असल्याने कल्याण सहित अन्य शहरातील व्यापारी आणि नागरिक वाहन घेऊन येण्यास सुरुवात झाली. मात्र, शहरातील खड्डेमय रस्त्यामुळे वाहतूक कोंडी जागो जागी झाली आहे.

वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत ...
सकाळच्या सत्रात आणि सायंकाळी 4 नंतर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत असून, रस्त्यात खड्डे मुळे पालिकेऐवजी पोलिसांना वाहन चालकांची बोलणी खावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

केडीएमटीला फटका ...
डबघाईला आलेल्या केडीएमटीला ही या खड्डेमय रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे फटका बसत असून, त्याबाबत अधिकारी वर्गाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देवदास टेकाळे यांनी दिली

प्रतिक्रिया
रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजवणे काम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी महत्वाचे रस्ते हाती घेणार होतो. मात्र, परतीच्या पावसाने कामाला खो घातला. पाऊस थांबताच कामाला सुरूवात करू, अशी माहिती पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली.

दिवाळी पूर्वी रस्ते दुरुस्ती व्हावे यासाठी पालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. शहाड, वालधुनी पुलावर आणि परिसरात भले मोठे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आमचे कर्मचारी दिवस रात्र ती दूर करण्याचा प्रयन्त करत आहेत. मात्र, खड्डयामुळे ती दूर करण्यास अडचण येत असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com