कर्जमाफीच्या घोषणेनंतर ७८८ शेतकऱ्यांची आत्महत्या

Marathi news 788 farmers suicides
Marathi news 788 farmers suicides

मुंबई - नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यात गेल्या दहा महिन्यांत २४१४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली. मात्र त्यानंतरही आतापर्यंत ७८८ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

गेल्या वर्षी रोज सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करत होते. यावर्षी ते प्रमाण ८ वर गेले आहे. दुष्काळ, नापिकी, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. 

राज्यात गेल्या दहा महिन्यात ज्या २४१४ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या त्यापैकी १,२७७ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली आहे. उर्वरित ११३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय निकषास पात्र ठरलेल्या नाहीत. अर्थात, त्यांनी कर्जबाजारीपणा वा नापिकीमुळे नव्हे, तर अन्य कारणांनी मृत्यूला कवटाळले, अशी माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com