‘...तेव्हा कुठे होती आपुलकी?’ 

‘...तेव्हा कुठे होती आपुलकी?’ 

मुंबई - ‘मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत आपुलकी होती,’ या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीका केली. ‘१९९३ मध्ये लिहिलेल्या अग्रलेखासाठी २००० मध्ये शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, तेव्हा ही आपुलकी कुठे होती,’ असा प्रश्‍न करून, बाळासाहेबांनी आरक्षण, मुंबई तोडण्याचा डाव, वेगळ्या विदर्भाबाबत ज्या भूमिका ५० वर्षांपूर्वी मांडल्या, त्या पवारांना आता पटायला लागल्या, असे ते म्हणाले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यात पवार यांची मुलाखत घेतली होती. त्या संदर्भात उद्धव यांनी ही टीका केली .

‘जातीच्या नावावर शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवसेना सोडणारे आता कोठे आहेत, हे बघा. त्यांच्या काळातही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न झालाच,’ अशा शब्दांत उद्धव यांनी पवारांवर हल्ला चढविला. मी ही मुलाखत चोरूनही पाहिली नाही, असे ते म्हणाले. आमदार नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील २० वर्षांच्या प्रवासाचे चित्रण असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी उद्धव यांनी भाजप सरकारवरही हल्ला चढविला. ‘पंजाब नॅशनल बॅंकेतील उघडकीस आलेल्या गैरव्यवहारामुळे ‘राफेल’ विमान खरेदी गैरव्यवहार मागे पडला,’ अशा शब्दांत भाजपवर टीका करतानाच आजवर विविध प्रकल्पांचे करार, भूमिपूजन झाले, पण प्रत्यक्षात एकही वीट रचली नाही. त्यामुळे आता गुंतवणुकीच्या सोहळ्यांना न जाता थेट प्रकल्पांच्या उद्‌घाटनालाच जाणार. नवी मुंबई विमानतळाचे उद्‌घाटनही आम्हीच करू, असा टोला उद्धव यांनी लगावला. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेस उपस्थित न राहिल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘‘या वर्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ होता. पुढील वर्षी वेगळा महाराष्ट्र असेल. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com