पवारांना आर्थिक निकष आताच का आठवला? 

पवारांना आर्थिक निकष आताच का आठवला? 

मुंबई - आजवर वेगवेगळ्या समाजांना आरक्षण देण्याच्या मागण्या पुढे आल्या. त्या पूर्णही केल्या गेल्या. असे असताना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आताच का केले, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी केला. 

राणे म्हणाले, ""आर्थिक स्थिती हलाखीची असलेली मंडळीच आरक्षणाची मागणी करतात. मराठा समाजाचे सामाजिक सर्वेक्षण झाल्यानंतरच 16 टक्‍के आरक्षण देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. राज्य सरकार मराठा, धनगर, मुस्लिम अशा विविध समाजास आरक्षण देण्याची प्रक्रिया करत आहे. या समाजाच्या मागण्या प्रत्यक्षात याव्यात, यासाठी प्रयत्न सुरू असताना पवारांना आर्थिक निकष कसा आठवला, याचे आश्‍चर्य वाटते. 34 टक्‍के मराठा समाज आरक्षणाची प्रतीक्षा करत असताना हा विषय योग्य प्रकारे हाताळला न गेल्यास काय होईल, ते आगामी निवडणुकीत दिसेलच. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मला काहीही बोलायचे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच काय ते बोलावे, असे राणे म्हणाले. 

नाणार प्रकल्प कोकणात कशाला? 
शिवसेनेचे मंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय काहीही करत नाहीत. त्यांना विचारूनच नाणार प्रकल्पावर स्वाक्षरी केली गेली. आता त्यांना विचारूनच विरोध होत आहे, अशी टीका राणे यांनी केली. नाणार प्रकल्प पर्यावरणस्नेही आहे, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, तसे असल्यास हा प्रकल्प कोकणात कशाला, तो राज्यात कुठेही न्यावा. शिवाय तो आंध्र प्रदेशने का नाकारला, याचे उत्तरही सरकारने द्यावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com