सरळगांव - ओखी वादळानंतर धुक्याचे प्रमाण वाढल्याने गेले दोन दिवस माळशेज घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. घाटात 2 फुटावरचेही काही दिसत नसल्याने अपघात होण्याची भीती वाढली आहे.
मुरबाड तालुक्यात ओखी वादळाच्या तडाक्याने पडलेल्या पावसाने ओल्या झालेल्या रस्तावर अपघात होत असल्याची घटना ताजी असतानाच आता धुक्याचे प्रमाण वाढल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यात गेली दोन दिवस सकाळी 10 वाजेपर्यंत धुकं सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटात धुक्याचे प्रमाण जास्त आहे. पहाटेच्या वेळी तर 2 फुटापर्यांत समोरचेही काही दिसत नसल्याने वाहन चालकांना जिव मुठीत धरुन आपले वाहन चालवावे लागत आहे. पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, दूधाची वाहतूक करणा-या गाड्यांचे प्रमाण जास्त असते. भाजीपाला बाजाराच्या ठिकाणी वेळेवर पोहोचावे या हेतूने वाहन चालक वेगाने वाहने चालवतात. अशाच वेगाने चालवत असलेल्या एका टेम्पोला अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पडणा-या धुक्यामुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.