मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजनेत सवलत जाहीर

मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजनेत सवलत जाहीर

मुंबई - मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 हजारांची थकबाकी असल्यास सुरवातीला 3 हजार व 30 हजारांपेक्षा अधिक थकबाकी असल्यास 5 हजार रुपये भरण्याची सवलत आज जाहीर केली आहे. ही रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे त्यांच्यासाठी प्रत्येक फीडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

मुंबईत महावितरणचे मुख्यालय प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या ज्या शेतकऱ्यांना आपली देयके वाढून आली आहेत असे वाटत असेल त्यांनी फीडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन आपली देयके तपासून घ्यावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com