शेतकऱ्यांना कर्ज मिळायला हवे : राजू शेट्टी

शेतकऱ्यांना कर्ज मिळायला हवे : राजू शेट्टी
शेतकऱ्यांना कर्ज मिळायला हवे : राजू शेट्टी

मुंबई : शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, हमी भाव मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, या मागण्यांवर ठाम असल्याचे आज (शनिवार) खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

शेतकरी समन्वय समितीची बैठक आज (शनिवार) मुंबईतील माहिमच्या शषतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, रघुनाथदादा पाटील, अजित नवले, बी जी कोळसे पाटील आदी उपस्थित होते. "खरिपाचा वित्तपुरवठा अडचणीत' या सकाळमधील बातमीवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी सकाळचा उल्लेख करत खरीपासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, अशी मागणी केली. त्यामुळे रविवारी दुपारी अतिथीगृहात सरकारच्या विशेष समितीशी होणाऱ्या बैठकीत हा मुद्दा समाविष्ट करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणे, हमी भाव मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, या मागण्यांवर ठाम असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com