राज्यात पावसाची शक्‍यता 

राज्यात पावसाची शक्‍यता 

मुंबई - बंगालच्या उपसागरातील वादळामुळे राज्यात पावसाची आशा निर्माण झाली आहे. हे वादळ दक्षिणेकडील किनारपट्ट्यांकडे सरकत असल्याने बाष्पामुळे राज्यात थोडाफार पाऊस पडू शकतो. 

राजस्थानातही परतीच्या पावसाची लक्षणे ठळक झाली आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राजस्थानच्या क्षेत्रात पाऊस पडलेला नाही. या भागांत ढगांची निर्मिती होणेही बंद झाले आहे. या भागात पाच दिवस पाऊस पडला नाही. तेथील आर्द्रता घटली की परतीच्या पावसाची लक्षणे ठळक होतात. सध्या हीच परिस्थिती दिसून येत आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा बदलली की केंद्रीय वेधशाळा परतीच्या पावसाचा प्रवास राजस्थानातून सुरू झाल्याचे जाहीर करते. काही दिवसांत वाऱ्यांची दिशा बदलल्याचे निरीक्षण स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय वेधशाळेकडून याबाबतची घोषणा होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. जी. आर. कुलकर्णी यांनी दिली. 

परतीचा पाऊस सुरू झाला की, पावसाचे प्रमाण फारसे नसते. सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचे रूपांतर वादळात झाल्याची घोषणा केंद्रीय वेधशाळेने केली आहे. ओडिशा किनारपट्टीकडे हा पट्टा सरकत आहे. सध्या ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने हे वारे वाहत आहेत. या पट्ट्याच्या प्रभावातील बाष्पामुळे महाराष्ट्रातील काही भागांत शुक्रवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते. 

कृषी विभागाचा इशारा 
- सिंधुदुर्गात शनिवारपर्यंत, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत शनिवारी, सातारा व नांदेड जिल्ह्यांत शुक्रवारी मुसळधार. 
- विदर्भात दोन दिवस पावसाचा धुमाकूळ. 
- अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली भागात जोर जास्त. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com