बारावीच्या पहिल्या पेपरला १००० जणांची दांडी

बारावीच्या परीक्षा कालावधीत कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Exam
Examesakal

नांदेड : जिल्ह्यात बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा शुक्रवारपासून (ता. चार) सुरु झाल्या आहेत. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्तीच्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी परिक्षा विभागामार्फत २८९ बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात बारावी बोर्डाच्या परिक्षेला ३९ हजार ८२१ परिक्षार्थी प्रविष्ट झाले होते. पहिल्या दिवशी शुक्रवारी ३८ हजार ७६३ परिक्षार्थिंनी परीक्षा दिली. तसेच पहिल्याच पेपरला एक हजार ५८ परीक्षार्थींनी दांडी मारल्याची माहिती समोर आले आहे.

बारावीच्या परीक्षा कालावधीत कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पोलिस, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी उपस्थित होते. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८५ केंद्र आणि २०४ उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांवर केंद्रसंचालकही नियुक्त करण्यात आले आहेत. बारावीसाठी ८५ केंद्र संचालक आणि २०४ उपकेंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, यासाठी बारावीच्या केंद्रावर २८९ बैठे पथक कार्यान्वीत असणार आहेत. बैठे पथकामध्ये तहसीलदारांनी महसूल विभाग, पंचायत समिती आणि शिक्षण विभागाच्या प्रत्येकी एक प्रतिनिधी नेमला आहे. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता यांचाही समावेश आहे. एखाद्या परीक्षा केंद्रावर पाचपेक्षा अधिक कॉपी केस झाल्यास संबंधित परीक्षा केंद्रावर प्रशासकीय कारवाईची सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com