आरोप करून राज्यातील प्रश्‍न सुटणार का?

आरोप करून राज्यातील प्रश्‍न सुटणार का?

मलवडी - विरोधकांना कुत्र्या-मांजराच्या उपमा देवून राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? राज्यापुढील प्रश्न सोडविण्यास सरकार अपयशी ठरले असून हल्लाबोल आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचे नियंत्रण सुटले आहे, अशी खोचक टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली.

दहिवडी येथे हल्लाबोल आंदोलनादरम्यान झालेल्या सभेनंतर ‘सकाळ’ प्रतिनिधीशी संवाद साधताना ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, ‘‘सरकार भानावर नाही, त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटू लागले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री विरोधकांना विविध जनावरांच्या उपमा देत आहेत. पण, त्यामुळे जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? उगीच सरकारचं अपयश लपविण्यासाठी विरोधकांवर तोंडसुख घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सामान्य जनता तुमच्या असल्या आरोपांना आता भीक घालणार नाहीत. यापूर्वी (कै.) राजीव गांधी यांच्याकडून अशीच विरोधकांना कमी लेखण्याची चूक झाली होती अन्‌ त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपची अवस्था त्यापेक्षा बिकट झाली असून पराभव समोर दिसू लागल्यामुळे ते हिन पातळीवर उतरून एक प्रकारे आपला पराभव मान्य करत आहेत. असल्या आरोपांनी ‘राष्ट्रवादी’ला फरक पडणार नाही. ’’

मुख्यमंत्री विरोधकांना विविध जनावरांच्या उपमा देत आहेत. त्यामुळे जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? उगीच सरकारचं अपयश लपविण्यासाठी विरोधकांवर तोंडसुख घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
- अजित पवार,  माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com