...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल - बच्चू कडू

...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल - बच्चू कडू
भोसे (पंढरपूर) - कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे, तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल; तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आमदार कडू आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कडू म्हणाले, ""कर्जमाफीचा निर्णय हा संभ्रम करणारा असल्याने सुकाणू समितीने तो मान्य केलेला नाही. त्यासाठी 10 जुलैपासून राज्यभर जनजागरण यात्रा काढणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांसमोर शासन निर्णयाची पोलखोल करणार आहे. संतांचे कार्य हे पांडुरंगापुरते मर्यादित नसून ते शेतकऱ्यांपर्यंत आहे. संत तुकाराम महाराज यांनी पहिल्यांदा कर्जमाफी केली होती. असे सांगून मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करण्यापासून रोखू नका; निदान पूजेनंतर तरी पांडुरंग त्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची सद्‌बुद्धी देईल, असे ते म्हणाले.

"उरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे काय?'
भोसे (ता. पंढरपूर) येथील एकूण कर्जदार शेतकऱ्यांच्या दोन कोटी 61 लाख रुपयांच्या थकीत कर्जापैकी केवळ 41 सभासद शेतकऱ्यांना 35 लाख रुपये कर्जमाफ होणार आहे. उरलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे काय? असा सवाल सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com