Ganehs Festival : आवाजाची भिंत करेल घात!

Ganehs Festival : आवाजाची भिंत करेल घात!

'आवाजाच्या भिंती' वाजल्या तरच गणेशोत्सवात मजा येते, असे मंडळांतील हौशी कार्यकर्त्यांना वाटते. वास्तविकता, ही हौस जिल्ह्यातील अनेकांच्या जिवावर यापूर्वी बेतली आहे. अतिआवाजाने काहींचा बळी घेतला आहे, तर काहींना आयुष्यभराचा त्रास दिला आहे. शिवाय, ध्वनिमर्यादा ओलांडल्याने गुन्हा दाखल होऊन काहींचे करिअरही उद्‌ध्वस्त झाले आहे. क्षणिक आनंदासाठी अट्टहास करणे म्हणजे आपणच समाजाचे, कुटुंबीयांचे गुन्हेगार ठरणार आहोत.

गणेश, नवरात्र, दहीडंही उत्सवात काही अतिउत्साही कार्यकर्ते आवाजाच्या भिंतीसाठी (मोठ्या आवाजाची साउंड सिस्टिम) दुराग्रही असतात. त्याला काही नेतेही पाठबळ देत असल्याने अशा कार्यकर्त्यांचा चेव वाढतो. मतांची बेरीज करण्यासाठी राजकीय नेतेमंडळी कार्यकर्त्यांना, तरुणांना साउंड सिस्टिम आवडते, असे सांगून त्याला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देत असतात. यापूर्वी या आवाजाच्या दणदणाटामुळे सातारा जिल्ह्यात काहींचा बळी गेला आहे.

2014 मध्ये साताऱ्यातील राजपथावर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत जीर्ण भिंत पडून तिघांचा मृत्यू झाला होता. पारगाव-खंडाळा येथे दणदणाटामुळे युवकाचा हृदय बंद पडून अंत झाला होता. याशिवाय, साउंड सिस्टिम लावताना शॉक बसून, साउंडवरून पडून युवक जखमी झाले होते. तसेच गर्भवती महिला, बालक, वयोवृध्द, आजारी लोकांवर या आवाजाचा थेट दुष्परिणाम होत असतो. अशा आवाजाच्या दणदणाटाचा विपरित परिणाम झाल्यास महिनोंमहिने उपचार आणि लाखो रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे अशा धडाकेबाज आवाजापासून दूरच राहिलेले बरे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत असतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com