भिलवडी - माळवाडी (ता. पलूस) येथील शालेय मुलीच्या खूनप्रकरणातील 27 संशयित सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, मजबूत आरोपपत्र दाखल व्हावे यासाठी तपास सुरू असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पीडित कुटुंबीयांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. 'ही घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलिस योग्य पद्धतीने तपास करीत असून, अंतिम निष्कर्षापर्यंत पोचले आहेत. खटला जलदगती न्यायालयात चालवून उज्ज्वल निकम यांच्यासारखे नामवंत वकील देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,'' असे पाटील म्हणाले. अशा घटनांमधून राजकारण करणे, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे व तेढ निर्माण करणे अयोग्य आहे, असे सांगून
ते म्हणाले, 'गृहखाते सांभाळण्यास मुख्यमंत्री सक्षम आहेत. केवळ विरोध म्हणून कायदा-सुव्यवस्थेबाबत विरोधक टीका करीत आहेत. सर्व बाजूने सखोल तपास करीत आरोपींना फाशी दिली जावी असा प्रयत्न आहे.''
|