भाजप सरकारकडून भ्रमनिरास - पतंगराव कदम

भाजप सरकारकडून भ्रमनिरास - पतंगराव कदम

भिलवडी - ""भाजप सरकारने सर्वच पातळीवर लोकांचा भ्रमनिरास केला आहे. जनता आता पुन्हा चूक करणार नाही,'' असे प्रतिपादन माजी मंत्री पतंगराव कदम यांनी केले. भिलवडी गटातील प्रचारा वेळी ते बोलत होते. त्यांनी हजारवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी, खंडोबाचीवाडी, चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळ, वसगडे येथे भेट दिली. 

ते म्हणाले, ""अडीच वर्षांत काय विकास झाला हे जनता जाणून आहे. कार्यकर्त्यांनी आत-बाहेर न करता मी उभा आहे, असे समजून काम करावे. पलूस तालुक्‍यात कॉंग्रेसला चांगले वातावरण आहे. आपण सर्वसमावेशक उमेदवार दिले आहेत.'' 

बिले काढण्यास विरोधकांकडे 

बिले काढण्यास काही विरोधात गेले आहेत. त्यांचा चांगला "बंदोबस्त' करू, असा इशारा श्री. कदम यांनी चुळबूळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com